कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आवक घटल्याने शहाळी महाग

मुंबई : कडक उन्हाच्या काहिलीत थंडावा मिळविण्यासाठी शहाळ्याच्या पाण्याला मागणी वाढली आहे. मात्र, आवक घटल्याने शहाळ्याच्या दरात २० ते २५ रुपयांनी वाढ झाली. परिणामी, एका शहाळ्यासाठी ६० ते ८० रुपये मोजावे लागत आहेत.

आरोग्यवर्धक शहाळ्याच्या पाण्याच्या नियमित सेवनाने उष्म्याशी निगडीत आजार बरे होतात. रुग्णांना शहाळ्याचे पाणी देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे शहाळ्यांना शहरात वर्षभर चांगली मागणी असते. मात्र, हवामान बदलामुळे शहाळ्याची आवक कमी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

रेल्वे स्थानके, बाजारपेठा आणि कार्यालये आदी परिसरात मोठ्या प्रमाणात शहाळ्यांचे विक्रेते दृष्टीस पडतात. उन्हाळ्यात शितपेये पिण्याकडे अनेकांचा कल असतो. त्याचप्रमाणे लिंबू सरबत, कोकम सरबत, कैरीचे पन्हे किंवा फळांच्या रसाने तहान शमविण्याची संख्याही अधिक आहे. मात्र, आरोग्यवर्धक अशा शहाळ्याला मुंबईकर पसंती देत आहेत.

हवामान बदलामुळे त्याची आवक कमी झाली आहे. परिणामी, शहाळ्याची किंमत २० ते २५ रुपयांनी वाढली आहे. केरळ, आंध्र प्रदेश येथून मुंबईत मोठ्या प्रमाणावर शहाळ्याची आवक होते. मात्र गेले काही दिवस आंध्र प्रदेश, केरळ येथील शहाळी आणि नारळांची आवक कमी झाल्याचे नारळ विक्रेते महेश भानुप्रताप यांनी सांगितले.

दर असे…

काही दिवसांपूर्वी ४५ ते ५५ रुपयांना मिळणारे शहाळे आता ६० ते ८० रुपयांना विकले जात आहे. तसेच १० ते १५ रुपयांना मिळणारे छोटे नारळ २० ते २५ रुपयांना मिळत आहेत. मध्यम आकाराचे २५ रुपयांना मिळणारे नारळ सध्या ३० ते ३२ रुपयांना मिळत आहेत.


रिपोर्टर

  • Ramchandra Khadape
    Ramchandra Khadape

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    Ramchandra Khadape

संबंधित पोस्ट