कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर…

 आरक्षणाच्या मुद्द्यावरून कडूंचा हल्ला

 नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील तिसऱ्या दिवशी बुधवारी (13 डिसेंबर) मराठा आरक्षणावर सभागृहात चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षणा संदर्भातील 293 च्या प्रस्तावावर बोलताना आमदार बच्चू कडू यांनी सर्वच पक्षातील नेत्यांवर टीकास्त्र डागले. त्यांनी जातीपातीच्या नावावर राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवू नका असे म्हणत जर एवढे जातीवदी लोक सभागृहात काम करत असतील तर या सभागृहाचे पावित्र्य कसे राखले जाईल असे म्हणत नेत्यांचे कान टोचले.

पुढे बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, जातीपेक्षा हक्कापेक्षा हक्काची लढाई महत्वाची असते. शेतकऱ्यांना त्यांचा भाव मिळत नाही, मजुरांना मजुरी मिळत नाही. शेतकऱ्यांना जर भाव मिळाला तर सगळं प्रश्न मिटतील. परंतू शेतकऱ्यांसाठी 75 वर्षांत कोणताच पक्ष काहीच करू शकत नाही हे दाखवून दिले. शेतकऱ्यांसाठी कुणीच उभं राहत नाही. माझ्यावर 350 गुन्हे दाखल झाले. 4 ते 5 गुन्ह्यात मला कोर्टाने पाच- पाच वर्षांची शिक्षा सुनावली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून असे होणे माझ्यासाठी काही नवीन नाही असेसुद्धा यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले.

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, जन्म झाला की, माणसाला जात आणि धर्म चिकटतो. तो मरेपर्यत कायम राहतो. जात सोडू नका, पण जातीवर वाद करू नका, जात कुणीच सोडली नाही पाहीजे. तशी तर जात ही विष आहे. कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी जात हे विषच आहे. ज्या मजुरांने हे सभागृह बांधलं त्याला 100 रोज होता. तर इंजिनिअरांना 800 रुपये. ही लुटीचे तंत्र आहे. जो जास्त कष्ट करेल त्याला लुटायचे. जो कमी मेहनत करेल त्याला जास्त दिल्या गेले. श्रीमंतानी अधिक श्रीमंत व्हावं आणि गरीबांनी अधिक गरीब व्हावं. मग गरिबाने श्रीमंताच्या घरी भांडी घासावी ही व्यवस्था आहे. आता व्यवस्थेला तोडण्याची ताकद आपल्या नाही म्हणून या व्यवस्थेपर्यंत आपण आलोय. आणि त्यावर आपली पोळी भाजायची आहे. असाही टोला बच्चू कडू यांनी सभागृहातील नेत्यांना लगावला.

जातीवर बोलाल तर महाराष्ट्र बेचिराख होईल

प्रस्तावावर बोलताना कडू म्हणाले की, आरक्षणावरून नेते मोठे होणार आणि कार्यकर्ते संपून जाणार आहे. मोठे- मोठे नेते द्वेष पसरविणारे भाषणं करत असतील कसं होईल. अरे बाबासाहेबांनी स्वतःच्या शरीरात कधी जात शिरू दिली नाही. ते म्हणाले होते की, मी आधीही भारतीय आणि नंतरही भारतीय आहे. आणि याच महापुरुषांना आपण जातीपातीत अडकवत आहोत. पेटवून दिले पाहीजे सगळ्यांना खरं तर. बाबासाहेबांचा पहिला पुतळा एका मराठ्याने उभारला याचा गर्व आहे. महात्मा फुलेंनी पहिली शिवजयंती साजरी केली. जातीपातीचे बंधन तोडत त्यांनी सुरुवात केली. असा हा महाराष्ट्र होता. पण आता तसे राहले नाही. काही सभा मी ऐकल्या त्यामध्ये एकजण म्हणतो 160 आमदांरांना आम्ही पाडू, ही काय भाषा आहे. एका मोठ्या नेत्यांने असं बोलण ठीक आहे का? एखाद्या कार्यकर्त्यांने बोललं असतं तर समजू शकलो असतो. एकमेकांवर आरोप करा पण समाजावर, जातीवर बोलाल तर राख होऊन जाईल ना सगळं, मग कोण थांबवेल हे. आपण समजदार लोकांनी जातीवर बोललो तर महाराष्ट्र बेचिराख होईल अशी भीतीसुद्धा बच्चू कडू यांनी यावेळी बोलून दाखवली.

अमृत पाजून मुख्यमंत्री व्हा

सध्या विविध सभांमधून मराठा म्हणजे अन्याय करणारी जमात उभी करून ठेवली. असं चित्र निर्माण करणं चुकीचे होईल. राजकारण तर होईल पण विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका, अमृत पाजून मुख्यमंत्री व्हा, घरं जाळणाऱ्यांचे हातपाय तोडून टाका, ती घटना निषेधार्हच आहे. पण या सभागृहात कोणीच मराठा मुलांच्या आत्महत्येवर बोलला नाही याचा खेद आहे. 50 मराठा मुलांनी आत्महत्या केल्या. त्याचा उल्लेख कुणी केला नाही. योगेश नावाचा पोरगा पीएच. डी. झालेला होता. त्याच्या बापाने आत्महत्या केली होती, घर पडकं होतं. शिकून, शिकून नोकरी लागत नाही म्हणून त्याने आरक्षणाचा आधार पकडला. पण तेही मिळत नाही म्हणून आत्महत्या केली. मराठवाड्यात पिकांना भाव मिळत नाही. सगळ्याच शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. त्या भागात त्याकडेही सरकारने लक्ष दिले पाहीजे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट