मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर केंद्रात तोडगा निघत नसेल तर राज्यातील 48 खासदारांनी एकजुटीने राजीनामा देण्याचे धाडस दाखवावे, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत असून त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. केंद्राच्या कॅबिनटे बैठकीत महाराष्ट्रातील खासदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करावा. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षण दिली नाही तर राजीनामा द्यावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठा आरक्षणावर खासदारांनी राजीनामा द्यावा, यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “केंद्रात महाराष्ट्रातील जे 6-7 मंत्री आहेत. त्यांनी राज्यातील अस्वस्थतेबद्दल पंतप्रधानांना सांगायला पाहिजे की, तुम्ही महाराष्ट्रा येऊ गेला आहात. महाराष्ट्र पेटत असून जातीपातीमध्ये भिंती उभ्या राहिल्या जात आहेत. सर्व समावेश आरक्षण तुम्ही देत आहा की नाही. जर मराठा समाजाला आरक्षण देणार नसाल तर आम्हाला तुमच्या मंत्रिमंडळात राहायचे नाही आणि राजीनामा द्या. तरच तरच मराठा आरक्षण पुढे जाईल. मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानांवर काही फरक पडत नसले. मग महाराष्ट्रातील सर्व पक्षातील 48 खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्यावा. महाराष्ट्राची ताकत काय असते. महाराष्ट्र कसा एकवट तो. नेहमी महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली. ती वेळ आता आली आहे. ती हुकूमशाही म्हणतो ती आता मोडून-तोडून टाकण्याची वेळ आलेली आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times