कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार

मुंबई : “हे कंत्राटी कामगारांच्या संबंधितचा अस्वस्थता कशाची होती. येथे नोकरी राहणार का यासंदर्भात काही माहिती नाही. या ठिकाणी ठरावी काळासाठी नोकरी आहे. 10-11 महिन्यासाठी नोकरी म्हटल्यानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्य स्थैर्य नाही. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने जागा भरणे योग्य नाही. हा आमचा आग्रह होता आणि त्याबद्दलची भूमिका  शरद पवार यांनी मांडली.”

राज्यातील वादग्रस्त असलेला कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यावेळी कंत्राटी भरती ही महाविकास आघाडी सरकारचे हे पाप आहे, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. महाविकास आघाडी सरकारने आता महाराष्ट्रीची माफी मागावी लागणार आहे. कारण महाविकास आघाडीने राज्यातील युवकांची दिशाभूल केल्याबद्दल, स्वत:चे पाप दुसऱ्यांच्या माथी मराल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. यावर कंत्राटी भरतीवरून देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले आहे.

कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला असून मागच्या सरकारचे हे पाप होते आणि तुमच्या आशीर्वादाने हा निर्णय घेतल्याचा आरोपा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर शरद पवार म्हणाले, “माझा आशीर्वाद असल्याचे मी वाचले होते. मी काय मंत्री मंडळाच्या बैठकीला जात नाही. पण महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री आहेत. तुम्ही मला एकाचे मत सांगितले तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी आज त्यावर वक्तव्य केले आहे. त्यात स्पष्ट दिसते की, ज्यावेळी यासंबंधित निर्णय घेतला गेला. त्या निर्णयाच्या बैठकीला अनेक सहकारी हजर होते. ते आजही सरकारमध्ये आहेत. त्यावेळी त्यांची सहमती होती आणि आज त्यासहमतीबाबत भाष्य देखील करत नाहीत.”

सध्याच्या सरकारमधील लोकांच्या सहमतीने निर्णय 

कंत्राटी भरतीचा निर्णय घेताना सध्या सरकारमध्ये असलेल्या लोकांची सहमती असल्याच आरोपही शरद पवारांनी केला आहे. यासंदर्भात शरद पवार म्हणाले, “आज देवेंद्र फडणवीसांनी जे काही मत मांडले, यात यापूर्वीच्या त्यांच्या सरकारने किंवा त्यांच्या सरकारमध्ये असलेल्या लोकांनी कंत्राटी भरती निर्णयाला सहमती दिली होती आणि त्यांच्या सहमतीने निर्णय झाले होते. ही गोष्टी लपवण्यात अर्थ नाही.”

मराठा आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष 

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टीमेंटला दोन दिवस शिल्लक राहिले आहे, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “राज्य सरकारचे काही सुसंवाद झाल्याचे दिसते. राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय घेते, याकडे आमचे लक्ष आहे. या दोन दिवसात सरकारची भूमिका स्पष्ट होईल, असे दिसत आहेत. यातून मराठा आरक्षणाबाबतचा प्रश्न सुटला तर आम्हाला त्यांचा आनंदच आहे.”


रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट