कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

जय जवान जय किसान प्रमाणेच जय कामगार हा नारा प्रत्येकाच्या मनात रुजणे गरजेचे - उद्धव ठाकरे



जय जवान जय किसान प्रमाणेच  जय कामगार  हा नारा सुद्धा प्रत्येकाच्या मनामनात रुजला पाहिजे. इथल्या भूमिपुत्राचा गौरव झाला पाहिजे असा विचार शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी आज कामगार मेळाव्यात व्यक्त केला.  भारतीय कामगार सेनेची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते.  माजी केंद्रीय मंत्री तथा भारतीय कामगार सेना अध्यक्ष अरविंद सावंत  कार्याध्यक्ष अजित साळवी  सरचिटणीस सचिन भावने संयुक्त सरचिटणीस संजय कदम  तसेच कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी  कार्यकारीणी सदस्य  कार्यकर्ते त्याचप्रमाणे मुंबई विमानतळ युनिट सदस्य व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्या वेळी युनियन लढत होत्या. त्यात कामगार सेना अग्रेसर होती. कामगारांच्या न्यायासाठी प्रसंगी मालकवर्गासोबत दोन हात करण्याचे कामही सेनेने केले आहे. कामगार जगला पाहिजे. त्यावेळेस युनियन कामगारांसाठी लढत होत्या. आता तो लढाच संपला आहे. कारण आता सर्वत्र कंत्राटी पद्धत बोकाळत असल्याने कामगार क्षेत्र असंघटीत होत आहे.  आता सरकारच कंत्राटदाराचे लाड करीत आहे आणि त्याचा मलिदा खात आहे. मात्र हे दिवस देखील जातील. नव्हे आपण पुन्हा जुने दिवस आणू असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

जय जवान जय किसान यासोबत शिवसेनाप्रमुखांनी जय कामगार अशी घोषणा दिली होती. कारण देशाच्या जडणघडणीत कामगार वर्गाचेही योगदान असल्याची जाणीव शिवसेनाप्रमुखांना होती. कामगारांमुळेच आज संघटना आणि त्यांचे नेते आहेत. मात्र नेत्यांमधील किती जणांना कामगारांचे जीणे माहिती आहे. एसी रुममध्ये बसून केवळ कामगारांच्या समस्यावर चर्चा करायची आणि निर्णय घ्यायचे यामुळेच आज कामगार क्षेत्र खिळखिळे झाले असून ही कामगारांच्या मनात धगधगणारी आग इथल्या सत्ताधाऱ्यांना जाळल्याशिवाय राहणार नाही. असेही उद्धव ठाकरे यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांना सुनावले. 

भारतीय कामगार सेना म्हणजे शिवसेना वडाची मजबुत पारंबी आहे. कधी रणांगणातून पळणार नाही हा शिवसैनिकाचा बाणा आहे!  विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये आपले काही गद्दार उंदीर इकडेतिकडे पळत आहेत पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी एकनिष्ठ असलेला भारतीय कामगार सेनेचा निष्ठावंत मावळा कुठेही सरकला नाही! आणि सरकणारही नाही असे आश्वासन भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सामंत यांनी दिले. 

कर्जमाफी नाही  शेतकरी काय गुन्हा करतो का माफी मागायला? त्याला  कर्जमुक्त  करायच हा विचार करणारे नेतृत्व 'उद्धवजी बाळासाहेब ठाकरे !   घार हिंडते आकाशी  तिचे लक्ष पिल्लापाशी  असे नेतृत्व उद्धवजी बाळासाहेब ठाकरे!  कोरोना काळात उद्धवसाहेबांनी केलेले काम अवघ्या जगाला दिसले, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला दिसले, परंतु दिसले नाही ते फक्त 'भारतीय जनता पार्टी'ला! ते आंधळे आहेत  बहिरे आहेत  मुके आहेत हे मला माहित नाही परंतु हे जाणीवपूर्वक केले जाते!  युनियनच्या अधिवेशनासाठी वृत्तवाहिन्या आल्या नसत्या  पण का आल्या? एकच माणुस आहे  रॉक ऑफ जिब्राल्टर असा इंग्रजी शब्द आहे  हा सह्याद्री हिमालयासारखा उभा आहे! आणि त्या सह्याद्रीवर आघात करण्यासाठी सर्वजण येत असतात.

दावोसला गेल्यावर आदित्यसाहेबांचा आम्हांला केवढा अभिमान वाटला. जगातील पत्रकारांनी दखल घेतली एका 32 वर्षीय तरुणाची  जगातील तरुणांनी दखल घेतली त्यांच्या व्हिजनची  त्यांच्या विद्वत्तेची! मरणात खरोखर जग जगते  या उक्तीनुसार  उद्योग जगला तर कामगार जगेल  तो उद्योग जगविण्याचे आणि कामगारांच्या आयुष्यात भरभराट करण्याचे काम माझी भारतीय कामगार सेना करते  याचा मला अभिमान वाटतो! असे गौरवोद्गार सावंत यांनी काढले.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट