कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

श्री स्वामी समर्थ ह्रदयस्थ सोहळा!


          अक्कलकोट निवासी श्री. स्वामी समर्थ यांचा समाधीलीला दिन  १८ एप्रिल २०२३ रोजी काळाचौकी अभ्युदय एज्युकेशन हायस्कूल बँक्वेट हॉल येथील स्वामीभक्त मेळ्यात अनेक कार्यक्रम  घेऊन भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ज्यामध्ये प्रामुख्याने स्वामी पादुका पूजन अभिषेक  आरत्या  भजन  महाप्रसाद आणि पुस्तक प्रकाशन असे कार्यक्रम ठेवण्यात आले होते.

         श्री स्वामी समर्थ हृदयस्थ हे स्वामी समर्थ अनुभव लेख संग्रहाचे प्रकाशन स्वामी समाधी लिला दिनाच्या निमित्ताने करण्यात आले. हे अनुभव लेखन सर्वसामान्य गृहिणींपासून उच्च पदस्थ व्यक्तींनी स्वतःच्या अनुभवांच्या आधारे केलेले आहे. हा लेखन उपक्रम अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे  राजापूर तालुका शाखेमार्फत  घेण्यात आला. सदर लेख संग्रह पुस्काची प्रस्तावना  डाॅ. सौ.अलका नाईक यांची आहे. संपादन माधुरी प्रल्हाद खोत स्वामीभक्त यांनी केलेले असून सौ.लता गुठे या प्रकाशिका आहेत. सौ.सुयोगा सुनिल जठार अध्यक्ष अभामसाप राजापूर तसेच पत्रकार श्री. रविंद्र देशमुख  श्री हेरंब लिमये आदर्श स्वराज्य चे संपादक उदय पवार प्रमुख पाहुणे लाभले होते. विविध ठिकाणांहून बहुसंख्य स्वामीभक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते. या लेखसंग्रहाचे संपूर्ण संकलन व इतर सर्व व्यवस्थापनाचे विशेष काम सौ.श्रद्धा स.पाटील उपाध्यक्षा अभामसाप राजापूर व सौ.संगिता लि.धावले यांनी करवून घेतले. श्री प्रकाश प्र. रावराणे यांनी मुद्रक म्हणून काम करुन दिले.

          यावेळी उपस्थित श्री. हेरंब लिमये  श्री. रविंद्र देशमुख  सौ. लता गुठे  डॉ. अलका नाईक  सुयोगा जठार सौ. श्रद्धा पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतात या पुस्तकाचे  कार्यक्रमाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये याबाबत उत्तम विवेचन केले. 

           या उपक्रमाच्या निमित्ताने अभामसाप राजापुर शाखेमार्फत सर्व निमंत्रित सन्माननीय स्वामीभक्त अनुभव लेखक यांना सन्मानपत्र प्रदान करून सन्मानीत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. संगीता धावले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूजा काळे यांनी केले.

          श्री स्वामी समर्थ हृदयस्थ  या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे आहे की यातील असलेले अनुभव लेखन हे प्रत्येकाचे स्वतःचे अनुभव असून त्यामधे कोणत्याही प्रकारचा बदल (एडिट) न करता जसेच्या तसे छापण्यात आले आहेत. तसेच या सर्व लेखन करणाऱ्या व्यक्ती या लेखक म्हणून प्रसिद्ध नसून समाजातील विविध स्तरावर काम करणाऱ्या व्यक्ती आहेत. स्वामीभक्ती' हा एकच समान दुवा या सर्वांमधे आहे. या ह्रदयस्थ स्वामीभक्तीमुळे सर्व साधक भक्त भेदभाव विरहित अशा एकाच समान पातळीवर कार्यरत आहेत.

        आणखीन एक वैशिष्ट्य होते कार्यक्रमात.. जे सामान्यतः आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यक्रमात दिसत नाही. देव, देश आणि धर्म ही त्रयी कधीच विसरता येत नाही किंबहुना विसरुन चालणारही नाही. आरत्या झाल्यानंतर सर्वांनी (सामुदायिक) राष्ट्रगीत गायन केले.. आणि जय हिंद  वंदेमातरम् घोषणाही देण्यात आल्या

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times

    The Global Times

संबंधित पोस्ट